शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सुविधांना ‘कोलदांडा’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 14:42 IST

वाशिम: जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मुलभूत सुविधांना ‘कोलदांडा’ दिला जात असून पिण्याचे पाणी, अल्प दरात जेवण, निवास, पैकी कुठलीच सोय होत नसल्याने शेतमाल विक्रीसाठी आणणाºया शेतकºयांची गैरसोय होत आहे

ठळक मुद्देशेतकºयांची गैरसोय मुक्काम पडल्यास घ्यावा लागतो हॉटेलचा आधार

वाशिम: जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मुलभूत सुविधांना ‘कोलदांडा’ दिला जात असून पिण्याचे पाणी, अल्प दरात जेवण, निवास, पैकी कुठलीच सोय होत नसल्याने शेतमाल विक्रीसाठी आणणाºया शेतकºयांची गैरसोय होत आहे. एखादवेळी मुक्काम पडल्यास त्यांना नाईलाजास्तव हॉटेल्सचा आधार घ्यावा लागत असल्याचे दिसून येत आहे. 

शेतीत अहोरात्र काबाडकष्ट करून शेतकरी पिकवत असलेल्या शेतमाल विक्रीचे हक्काचे ठिकाण म्हणून बाजार समितीकडे पाहिले जाते. यामाध्यमातून बाजार समित्यांनाही वर्षाकाठी लाखो, करोडो रुपयांचा सेस मिळतो. त्यातून शेतकºयांसाठी सुविधा निर्माण करणे क्रमप्राप्त आहे. मात्र, याकडे जिल्ह्यातील एकाही बाजार समितीचे विशेष लक्ष असल्याचे दिसत नाही. रिसोडमधील बाजार समितीत ओट्यांवर शेतकºयांऐवजी व्यापाºयांचा माल ठेवला जातो. पिण्याच्या पाण्याचा अभाव असून शेतकरी निवास तकलादू ठरले आहे. गोदाम व्यापाºयांना भाड्याने दिले जाते. लोणी येथील उपबाजार निर्मितीचे कामही रखडले आहे. शिरपूरच्या उपबाजार समितीचे वार्षिक उत्पन्न ७० लाखाच्या आसपास असताना विकास मात्र नगण्य आहे. याठिकाणी शेतकरी निवास नाही, गुरांना पिण्याच्या पाण्याची कुठलीच सोय नाही, शेतमाल ठेवायला अपूरी जागा असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. अनसिंग उपबाजारातही शेतकºयांना कुठल्याच सुविधा मिळत नसल्याचे चित्र आहे. याशिवाय वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा आणि मानोरा या तालुकास्थळी असणाºया बाजार समित्यांमध्येही सुविधा निर्माण करण्याकामी संचालक मंडळाचे तद्वतच प्रशासनाचे बहुतांशी दुर्लक्ष झाल्याने शेतकºयांची गैरसोय होत आहे. 

टॅग्स :agricultureशेती